ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ सुरूच आहे. गणेशोत्सवादरम्यान केलेल्या गर्दीचे दुष्परिणाम सध्या जाणवू लागले आहेत. आज ८८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. हे प्रमाण चार टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. ८२जण कोरोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. महापालिकेने आजवर २० लाखापेक्षा जास्त ठाणेकरांची कोरोना चाचणी घेतली आहे.
महापालिका क्षेत्रात दरदिवशी रूग्णसंख्या वाढीचा आलेख चढताच आहे. नवरात्रीच्या दरम्यान गर्दी टाळली नाही तर पुन्हा एकदा ठाणेकरांना लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक ३७ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत.१२जण उथळसर येथे तर दहा रूग्ण लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीमध्ये मिळाले आहेत. नौपाडा-कोपरी क्षेत्रात नऊ आणि वर्तकनगर प्रभाग समिती परिसरात आठ रुग्ण वाढले आहेत. कळवा भागात पाच,वागळे येथे तीन आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात दोन रूग्ण नोंदवले गेले आहेत. सर्वात कमी एका रुग्णाची नोंद मुंब्रा येथे झाली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ८२जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ३६ हजार ५६६जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ७२५ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत दोन हजार ९१जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील दोन हजार २६४ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये ८८जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २० लाख ५९१ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ३९ हजार ३८२जण बाधित मिळाले आहेत.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.