मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक झाली होती. या अटकेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात निदर्शनं झाली. मुंबईतील राणेंच्या घराबाहेरही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या अटक नाट्यामुळे स्थगित झालेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी पुन्हा रत्नागिरीतून सुरू झाली आहे. मात्र, राणे विरुद्ध शिवसेना हा शाब्दीक वाद सुरूच आहे. राणेनंतर आता राणेपुत्र नितेश राणेंनीही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून आला. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. नारायण राणेंना अटक झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली. दरम्यान, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा एकदा राणे जनआशीर्वीदासाठी आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तापलेलं राजकीय वातावरण अद्यापही शमल्याचं दिसत नाही. राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव… हे सांगणारा डिजिटल फलक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचलं आहे. यापूर्वी नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना 75 व्या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसल्याचे सांगत टीका केली.

This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.