पुणे : केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील ४ मंत्र्यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढल्या. भाजपच्या या चारही मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रे गेली, त्या त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजप मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधताना पवार यांनी केंद्र सरकार देखील टीकास्त्र सोडले. देशातील सर्व राज्यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गांभीर्याने घ्यावी असे केंद्र सरकारने सांगितले आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगत आहे. असे असतानाही दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या नव्या मंत्र्यांना यात्राही काढायला सांगत आहे. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जेथे जेथे यांची जन आशीर्वाद यात्रा गेली, तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसेल, असे पवार म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.