• Privacy Policy
  • Advertise With us
  • Contact Us
सोमवार, मार्च 27, 2023
  • Login
No Result
View All Result
Google News
The GNP Marathi Times
Marathi News App
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
No Result
View All Result
GNP Marathi Times
No Result
View All Result
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
Home राजकीय बातमी - Political News

विधान परिषदेसाठी भाजपाचे पाच उमेदवार जाहीर

by GNP Team
नोव्हेंबर 20, 2021
in राजकीय बातमी - Political News
1
भाजप राज्यभर २० हजार सभा घेणार
0
SHARES
0
VIEWS
Follow us Follow us Follow us

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात मुंबई – राजहंस सिंह, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूर – अमल महाडीक, धुळे-नंदुरबार – अमरिष पटेल आणि अकोला-वाशीम – वसंत खंडेलवाल यांच्या नावांचा समावेश आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २३ नोव्हेंबर अशी आहे. यामध्ये मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहेत. मुंबईमधून याआधी दोन उमेदवार निवडून गेले होते. त्यात काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम यांचा समावेश होता. मात्र, आता रामदास कदम यांना संधी न देता त्या जागी सुनील शिंदे यांचे नाव शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेस येथून उमेदवारी देण्याच्या विचारात नाही, असे माहिती आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची अडचण झाली आहे. दुसरा उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे दुसरा उमेदवार द्यायचा की नाही या विचारात महाविकास आघाडीचे नेते आहेत. परिणामी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले राजहंस सिंह यांना निवडून येण्याची श्क्यता अधिक आहे. कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अमरीश पटेल पूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते पुन्हा निवडून आले. भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यामुळे ती जागा आता भाजपाकडे जरी असली तरी काँग्रेसने तेथे उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसकडून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे गिरीश व्यास आधी निवडून आले होते. त्यांच्याऐवजी आता भाजपाने ओबीसी नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने भाजपाचे छोटू भोयर यांना संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण या मतदारसंघासाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाहीत. अकोला-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विद्यमान आमदार आहेत. त्यांनाच शिवसेना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

नेत्यांची पार्श्वभूमी

राजहंस सिंह – राजहंस सिंह हे १९९२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. वर्ष १९९२ ते १९९७ या काळात ते नगरसेवक होते. नंतर २००२ ते २०१२ पर्यंत सलग ते नगरसेवक होते. या कालावधीत २००४ ते २०१२ पर्यंत सलग आठ वर्षे त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पालिकेत कामगिरी बजावली आहे. दरम्यान २००९ मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. २००९ ते २०१४ ते विधानसभा सदस्यही होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजपाध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई भाजपाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

हे पण वाचा :  "भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत": प्रियांका गांधी

अमल महाडिक – कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातून भाजपाकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपाचे अमल महाडिक असा सामना रंगणार आहे. २०१४ मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशी लढत झाली होती. त्यावेळी महाडिक यांनी पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते.

अमरिश पटेल – पटेल हे मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (१९९० ते २००९) शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काँग्रेससाठी काम केले. आतापर्यंत कधीही विधानसभा निवडणूक हरली नाही, असा त्यांचा लौकिक आहे. राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी पद भूषवले. पटेल यांनी शालेय शिक्षण, संस्कृती, क्रीडा कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले होते. युवक कार्य (महाराष्ट्र शासन) २००३-०४ मध्ये तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. २००९ मध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना विधान परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य घोषित करण्यात आले. मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

हे पण वाचा :  "भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत": प्रियांका गांधी

स्रोत: रत्नागिरी खबरदार

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.

GNP Team

GNP Team

संबंधित बातम्या

“भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत”: प्रियांका गांधी

“भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत”: प्रियांका गांधी

by GNP Team
मार्च 26, 2023
0

काँग्रेस सरचिटणीस आणि राहुल गांधींची बहीण, प्रियंका गांधी वाड्रा यांनी...

“भाजप तुमचे हक्क काढून घेण्याचे काम करत आहे,” राहुल गांधी त्यांच्या पहिल्या गुजरात रॅलीत आदिवासींना म्हणाले

राहुल गांधी दोषी ठरल्यानंतर संसदेच्या दिवसापासून अपात्र ठरले

by GNP Team
मार्च 24, 2023
0

काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, त्याचे माजी अध्यक्ष राहुल...

2019 मध्ये ‘सर्व चोर मोदी’ या टिप्पणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

2019 मध्ये ‘सर्व चोर मोदी’ या टिप्पणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

by GNP Team
मार्च 23, 2023
0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या...

गुजरात निवडणूक: आसामच्या मुख्यमंत्र्यांनी खर्गे यांच्या चहापानावर टीका केली

“आसाममधील सर्व मदरसे बंद करण्याची योजना”: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

by GNP Team
मार्च 17, 2023
0

भूतकाळात, श्री सरमा यांनी अनेकदा मदरसे कमी करण्याची किंवा या...

धनुष्य-बाण चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एससीकडे जावे

ठाकरे सेनेला आणखी एक झटका, आणखी एका आमदाराने शिंदे सेनेत प्रवेश केला

by GNP Team
मार्च 15, 2023
0

आमदार दीपक सावंत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...

अदानी रांगेत विरोधकांचा मोर्चा, संसदेजवळ पोलिसांशी मोठा सामना

अदानी रांगेत विरोधकांचा मोर्चा, संसदेजवळ पोलिसांशी मोठा सामना

by GNP Team
मार्च 15, 2023
0

यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला आहे की अदानी समूह...

Load More
Next Post
राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

Yellow Alert in Maharashtra : राज्यातील १९ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Please login to join discussion

ताजी बातमी

  • मुंबई गुन्हा | मुंबईतील ग्रँट रोड येथे शेजाऱ्याने पाच जणांवर चाक…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • नितीन गडकरी | केंद्रीय रस्ते वाहतूक गडकरींचा मोठा दावा – 2…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • फर्स्ट सिटिझन्स बँकेने खरेदी केली सिलिकॉन व्हॅली बँक, जाणून घ्या …
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • महाराष्ट्राचे राजकारण | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यास…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • उमेश पाल खून प्रकरण | माफिया डॉन अतिकला घेण्यासाठी STF साबरमती क…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत

प्रायोजित पोस्ट

हवामान

जाहिरात


  • ठाणे महानगरपालिका  अनधिकृत इमारतींमध्ये घर घेऊ नका

    Maha covid relief : कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान, प्रशासनाने केली वेबसाइट, वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • DIZO Buds Z Earbuds भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • E-Peek Pahani ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Jyotika in Sukh Mhanje Nakki Kay Asta : Ketki Vilas : Ketki Palav : सुख म्हणजे नक्की काय असतं मधील ज्योतिका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • D. B. Patil : डी. बा. पाटिल कोण होते?

    0 shares
    Share 0 Tweet 0

कॅटेगरीज

Read today's news in Marathi. GNP Marathi Times provides the latest news in the Marathi . मराठी भाषेतील बातम्या वाचा. marathi breaking news Our Authors/ Editors Contacts
Name - Pushkaraj Gharat
Email- pushkaraj@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 7208534445

Name - Umesh Daki
Email - umesh@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 8355915111

  • Contact Us
  • Marathi News RSS Feed
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Advertise With us

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ताजी बातमी
  • राजकीय बातम्या
  • जिल्ह्या नुसार बातम्या
    • ठाणे बातम्या
      • कल्याण डोंबिवली बातम्या
      • नवी मुंबई बातम्या
      • कोलशेत बातम्या
      • भिवंडी बातम्या
    • मुंबई बातम्या
    • नागपुर बातम्या
    • नाशिक बातम्या
    • चंद्रपूर बातम्या
    • सिंधुदुर्ग बातम्या
    • पुणे बातम्या
    • पालघर बातम्या
    • बिड बातम्या- Bid News
    • नंदुरबार बातम्या
    • सातारा बातम्या
    • औरंगाबाद बातम्या
    • सोलापूर बातम्या
    • कोल्हापूर बातम्या
  • आरोग्य बातम्या
  • क्रीडा बातम्या
    • क्रिकेट बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • शैक्षणिक बातम्या
  • करमणूक बातम्या
    • बॉलीवूड बातम्या – Bollywood News
  • तंत्रज्ञान बातम्या
    • कार बातम्या
    • मोबाइल संबंधित बातम्या
  • राज्य बातम्या
    • महाराष्ट्र बातम्या
  • व्यवसाय बातम्या
    • क्रिप्टोकरन्सी बातम्या
  • राशी भविष्य

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In