मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जन आशीर्वाद यात्रा पार पडली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन नारायण राणे यांनी अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद रंगला आहे.
शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले म्हणून त्या जागेचे शुद्धीकरण केले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार अबू आझमीशी हातमिळवणी करून आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसमोर नतमस्तक होऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.