राज ठाकरेंसोबतच्या स्नेहाबाबत अधिक बोलताना आशिष शेलार यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग यावेळी सांगितला. “मी मुद्दाम यावेळी उल्लेख करेन की माझी आई जेव्हा गेली त्यावेळी राज ठाकरे अर्धा-पाऊण तास खाली उन्हात माझ्यासाठी थांबले होते. मला तुलना करायची नाही किंवा काही अर्थही काढायचा नाही. पण मी हेही विसरू शकणार नाही की त्यावेळेला पुढच्या आठवड्याभराच्या कालावधीत माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रंगशारदामध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख एकदा नव्हे दोनवेळा कार्यक्रमासाठी आले. पण ते घरी आले नाहीत. त्यांची मर्जी ते आले नाहीत. त्यांनी फोनही केला नाही. एसएमएसही केला नाही किंवा संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. माझ्या आईसाठी त्यांनी त्या व्यक्त केल्या पाहिजे होत्या असा माझा आग्रही नाही. पण मी हे विसरणार नाही”, असं आशिष शेलार म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.