मुंबई : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रामायण महाकाव्याच्या आविष्कारातून महर्षी वाल्मिकींनी अत्युच्च प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. त्यातूनच प्रभु श्री रामचंद्रांचे प्रेरणादायी चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचले. जयंती निमित्त महर्षी वाल्मिकींना विनम्र अभिवादन आणि मनपूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.