मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी टोकीओ ऑलिम्पिकमधील पदक विजेत्याचे कौतुक करत खेळाडूंचा अभिमान असल्याचे म्ह्टले. तसेच नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून देशाची मान उंचावली असल्याचे कौतुकदगार काढले.
ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. विशेषत: नीरज चोप्राचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्याने देशाची मान उंचावलं आहे. त्याने सुवर्ण पदक मिळावलं आहे. सगळेच खेळाडू मेहनत करत आहेत. खेळात हार-जीत होत असते. ते त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेकमध्ये ८७.५८ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीनंतर भारतातून नीरजवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.