सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं आज (गुरुवारी 26 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झालं आहे, ते 56 वर्षांचे होते. 1991 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पालाल यांना सुवर्ण पदक, तर 92 साली महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवला होता. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात काही वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची कुटुंबातील सदस्यांनी माहिती दिली. अप्पालाल यांच्या पश्चात 3 मुलं आणि मुलगी असा परिवार आहे. आज रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.