नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी कृती समिती थेट दिल्ली येथे रवाना झाली. नंतर त्यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत चर्चा करताना विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने सिडको नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दिल्ली येथे शिष्टमंडळाच्या बैठकीत केला.
विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. त्यावेळेस त्या समितीने त्यांचे अभिनंदन केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आभार व्यक्त केले. तसेच या भेटीमध्ये विमानतळाच्या नामकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट
या समितीने कपिल पाटील यांच्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यावेळेस नामदार सिंधिया यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून अध्यक्ष दशरथ पाटील आणि त्या समितीचे म्हणणे ऐकून घेतले. नंतर त्याविषयी बोलताना जोतिरादित्य सिंधिया यांनी केंद्र सरकार नेहमीच भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झालेले नसल्याचे सांगितले. तसेच सिडको नामकरणाची घाई का करीत आहे, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, यांच्यासोबत शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मदार महेश बालदी, उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी., संतोष केणे, गुलाब वझे, दीपक पाटील, संतोष घरत, विनोद म्हात्रे, नंदेश ठाकूर, तांडेल, गोपीनाथ म्हात्रे, राजेश गायकर आदी उपस्थित होते.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com