पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा पलटवार केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे, असे म्हटले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.