दिवा : शहरातील प्रमुख रहदारीचा रस्ता असणाऱ्या मुंब्रा देवी कॉलनी भागातील फेरीवाले महापालिका प्रशासनाने हटवावेत व रस्ता वाहने आणि नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा, अशी मागणी समाजसेवक कैलेश पाटील यांनी केली आहे.
दिवा शहरातील रस्ते अरुंद आहेत. शहरात वाहनाची संख्या देखील वाढत आहे. अशा स्थितीत रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असल्याने वाहन चालकांनी वाहने पार्क कुठे करायची हा प्रश्न आहे. शिवाय फुटपाथ देखील फेरीवाल्यांनी काबीज केले असल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागा उपलब्ध नाही. नाईलाजाने नागरिक रस्त्याच्या मधून चालतात व यातून अपघात होण्याची शक्यता असते परिणामी पालिका प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुंब्रा देवी कॉलनी रस्ता फेरीवाले मुक्त करावा, अशी मागणी कैलेश पाटील यांनी केली आहे.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.