मुंबई : राज्यातील कॉलेज सुरु करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात फाईल मुख्य सचिवांकडे गेली आहे. जरा काल मिस कम्युनिकेशन झालं होतं. काल काही अटोनॉमी असलेल्या कॉलेजने आपली कॉलेजेस सुरू केली आहे. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे. अजित पवार साहेबांचं माझ्याशी बोलणं झालं आहे. 11 आणि 12 वीचे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज सुरू करणार आहोत, असं ते म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.