मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. परंतु आता निवळलेले हे वादळ दोन-तीन दिवसात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नव्याने निर्माण होणारे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होणार असून त्याचं नाव ‘शाहीन’ असणार आहे. शाहीन हे नाव कतारकडून देण्यात आलेलं आहे. भारतावर याचा प्रभाव नसणार आहे आणि चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं पुढे सरकणार आहे.
गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.