घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती-पत्नीच्या मृत्यूमुळे 3 मुले अनाथ झाली आहेत.
– जाहिरात –
ही दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील कासार पेठ येथे शुक्रवारी (३ मे) घडली. विजय गुलाब जाधव आणि निशा विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये घरगुती वाद सुरू होता. शुक्रवारी शेतात जात असताना विजय आणि निशा यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की विजयने पत्नी निशा हिच्या पोटात चाकूने वार केले.
या धक्कादायक घटनेत निशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विजयनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, पती-पत्नीच्या भांडणात दोन मुली आणि एक मुलगी अनाथ झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Credits And Copyrights : – breakingboom.com
This News has been generated from feed. If you have any problems with post, Please contact us.