नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान आज रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “घरात आणि पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री आपण पहिल्यांदाच पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असे म्हणत, केस केल्यामुळे राणे घाबरून जाईल असे वाटत असेल, मात्र, मी घाबरणारा नाही. ते रक्तातच नाही,” असेही राणे यावेळी म्हणाले.
याच वेळी राणे यांनी काही जुन्या प्रकरणांनाही हात घातला. सुशांतसिंह राजपूत हत्या आणि दिशा सालियान प्रकरण अद्याप संपलेले नाही. त्याचे आरोपी अजून मिळालेले नाहीत. हळू हळू सर्वच बाहेर काढणार आहे, असेही राणे यावेळी म्हटले. एवढेच नाही, तर आम्ही कायम विरोधी पक्षात राहणार नाही. आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी आणि पोलिसांनी कायद्यात राहून काम करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडी सरकार येऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत. या 2 वर्षांत कोकणाला काय दिले? असा सवालही राणेंनी केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा इरा देत, आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामे करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.