स्रोत: रत्नागिरी खबरदार
नवी दिल्ली : राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मर्द असतील तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांशी टक्कर घ्यावी उगाच महिलांना राजकारणात ओढू नये असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.
नवाब मलिकांनी सोमवारी सकाळी जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी अमृता फडणवीस यांचा आरोपीसोबतचा फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिलाय. तसेच मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना थेट टार्गेट करा माझ्यावर कसले आरोप करता माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्यात.
यावेळी अमृता यांनी सांगितले की, मी राजकारणी नसून सामाजिक कार्यकर्ती आहे. मुंबईत रिव्हर मार्च संस्थेने माझ्याशी त्यावेळी संपर्क साधला आणि नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी विनंती केली त्यानंतर मी त्यांना सहकार्य केले आहे. रिव्हर मार्च ही पब्लिक चळवळ आहे. नद्यांचे संवर्धन करण्यासाठी मी या चळवळीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.