राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलं होतं. यात त्यांनी इतिहासाचा आधार घेतला होता. राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंनी त्यांचे प्रबोधनकारांचे लिखाण नीट वाचावं. त्यांचं लिखाण राज ठाकरेंना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असा खोचक टोला लगावला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं भेट म्हणून पाठवणार असल्याचं म्हटलं होतं.
त्यात आता मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरे यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. “राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यास, संशोधक घेऊन चर्छा करावी. सत्य इतिहासाचे दर्शन करावं. त्यात संदर्भ व पुराव्यासह मांडणी होईल. उगाच मुक्ताफळं उधळून राज्याला वेठीस धरू नये”, असं मनोज आखरे म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.