कोरोना बाधित झालेल्या तीन भारतीय क्रिकेटपटूंना श्रीलंका सरकारने मायदेशी पाठवलं. आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान कृणाल पंड्या, यजुवेंद्र चहल व कृष्णाप्पा गौतम यांना करोनाची बाधा झाल्यामुळे सध्या विलगीकरणात ठेवले गेले आहे.
त्यांची सातत्याने चाचणी करण्यात येणार आहे. जर या चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तरच त्यांना भारतात परतता येणार आहे. मात्र, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना विलगीकरणाचा पूर्ण कालावधी पूर्ण केल्यावर तसेच पुन्हा चाचणी करत अहवाल पाहिल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही श्रीलंका सरकारने स्पष्ट केले आहे.
भारताने श्रीलंकेत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. मात्र, टी-20 सामन्यांची मालिका गमवावी लागली. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी पंड्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या भारताच्या आठ खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.