टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला खेळ थांबवण्यात आला आहे. दरम्यान आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कालच्या 4 बाद 124 पासून पुढे खेळायला सुरुवात करणार आहे.
पहिला दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला होता. कारण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 183 धावांवर रोखलं होतं. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगलीच ठरली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानावर तग धरुन खेळत होते. पण लंचब्रेक आधीच्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. भारताची 97 धावावर रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट पडली. लंचब्रेक नंतर भारतीय संघाला उतरती कळाच लागली. भारताचे एकामागे एक खेळाडू तंबूत जाताना दिसले.
विशेष म्हणजे इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अडरसन याने कर्णधार विराट कोहली याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर बेअरस्टोने अजिंक्य राहणे याला धावबाद केलं. एकीकडे विकेट पडत होत्या दुसऱ्या बाजूने केएल राहूल एकेरी कमान सांभाळण्याच्या प्रयत्नात दिसला. तो ऋषभ पंतसोबत डाव सावरण्याचा प्रयत्नात होता पण पावसाने खेळात व्यत्यय आणला. अखेर खेळ तात्पुरता थांबवण्यात आला.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.