नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून आतापर्यत 25 धावा केल्या. पावसामुळे सध्या खेळ थांबला असल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्तीची घोषणा करण्यात आली.
रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले या दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. ११.१ षटके खेळल्यानंतर पावसाने खेळात व्यत्यत आणला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. बर्न्स ११ तर सिब्ले ९ धावांवर नाबाद आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. या धावांसह भारताने आता ९५ धावांची आघाडी घेतली आहे. सलामीवीर लोकेश राहुल आणि मधल्या फळीत रवींद्र जडेजा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे भारताला हि धावसंख्या गाठता आली.तर इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने ५ आणि अँडरसनने ४ बळी घेतले. आता इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.