इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. या धावांसह भारताने आता ९५ धावांची आघाडी घेतली आहे. सलामीवीर लोकेश राहुल आणि मधल्या फळीत रवींद्र जडेजा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे भारताला हि धावसंख्या गाठता आली.तर इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने ५ आणि अँडरसनने ४ बळी घेतले. आता इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. जो रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. भारताच्या पाहिल्या डावात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले.पहिल्या दिवसअखेर नाबाद असणारा ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी लवकर बाद झाला. त्यानंतर राहुलने रवींद्र जडेजाला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी उभारली.राहुलने २१२ चेंडूत १२ चौकारांसह ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. राहुल माघारी परतल्यानंतर शार्दुल ठाकूरलाही अँडरसनने शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक फलकावर लावले. जडेजा ५६ धावांवर असताना रॉबिन्सनने त्याला ब्रॉडकरवी झेलबाद केले. जडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत २८ धावा जोडल्या. रॉबिन्सनने त्याला बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. त्याने ८५ धावांत ५ तर अँडरसनने ५४ धावांत ४ बळी घेतले.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.