नॉटिंगहममध्ये दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारताने शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. उपाहारापर्यंत १ बाद ९७ अशी मजल मारलेल्या भारताची अवस्था ४ बाद १२५ अशी झाली आहे. त्यामुले संपूर्ण संघ ढेपाळतो कि काय अशी भीती आहे. सद्यस्थितीत अंधुक प्रकाश आणि पावसामुळे ४६.१ षटकानंतर खेळ थांबवण्यात आला आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपली शक्ती दाखवायला सुरूवात केली आहे. उपाहारापर्यंत १ बाद ९७ अशी मजल मारलेल्या भारताची अवस्था ४ बाद १२५ अशी झाली आहे. रोहित माघारी परतल्यानंतर संघाचे आधारस्तंभ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. विशेष म्हणजे विराट शून्यावर माघारी परतला.इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले. अँडरसनने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेतेश्वर पुजारालाही अँडरसननेच बाद केले. त्याने ४ धावा केल्या. तर चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे ५ धावांवर तंबूत परतला. खेळ थांबला तेव्हा लोकेश राहुल ९ चौकारांसह ५७ तर ऋषभ पंत ७ धावांवर नाबाद होते.
दरम्यान पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. जो रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.