पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र पावसामुळे व्यत्ययामुळे नाणेफेकीला विलंब झाला. विलंबानंतर झालेली नाणेफेक इंग्लंडनं जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
भारतानं दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकुरऐवजी इशांत शर्माला संधी दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजय भारताच्या हातून पावसाने हिरावून नेला होता. त्यामुळे मालिकेत अद्याप कोणत्याही संघाला आघाडी नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंडचा संघ
जो रुट (कर्णधार), रोरी बर्नस, डोम सिबली, हसीब हमीद, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, जोस बटलर, सॅम करन, ओली रॉबिनसन, जेम्स अँडरसन, मार्क वूड
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.