भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लंचपूर्वी भारताने ७ गडी गमावून 346 धावापर्यत मजल मारली आहे. सध्या मैदानात रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा आहे. जाडेजा ३१ धावांवर खेळात आहे, तर अद्याप इशांतच खात उघडलं नाही आहे. त्यामुळे नेमका आता भारत किती धावांचा डोंगर उभारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडवर चांगली आघाडी मिळवली आहे. तब्बल 276 धावा केल्यानंतर भारताचे केवळ तीनच गडी तंबूत परतले होते. आज भारताने 276 पासून पुढे खेळाला सुरुवात करताच दोन ओव्हरमध्ये भारताचे दोन गडी तंबूत परतले. केएल राहुल बाद झाल्यानंतर एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. भारताच्या निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. केएल राहुलने १२९ धावांवर खेळत असताना ओली रॉबिनसनच्या गोलंदाजीवर डोम सिबलीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर भारताचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. अजिंक्य रहाणे केवळ १ धाव करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत ३७ धावा करत बाद झाला. तर मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मोइन अलीच्या गोलंदाजीवर रॉरी जोसेफने त्याचा झेल घेतला. सध्या रविंद्र जडेजा तळाकडच्या फलंदाजांसोबत एकाकी झुंज देत आहे.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.