बेल्जियमने भारताचा ५-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता भारतीय संघ कास्य पदकासाठी लढले. ऑलिम्पिकमध्ये भारताने आठ सुवर्णपदक जिंकली आहेत. पण गेल्या ४१ वर्षात भारताला एकही पदक जिंकला आले नाही. १९८० साली भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. कास्य पदकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघाविरुद्ध खेळेल.
पहिल्या क्वॉर्टरमध्ये एक मिनिट चार सेंकदाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमने पहिला गोल करून भारताविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांनी पहिल्यापासून चांगला खेळ केला. त्यानंतर भारताच्या हरमनप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. पहिल्या गोलनंतर एकाच मिनिटाता आठव्या मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स स्टिकने गोल करून भारताला २-१ अशी आघाडी करून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळे गोल २-२ असा बरोबरीत राहिला. चौथ्या क्वॉर्रटरमध्ये बेल्जियमने तिसरा गोल करून ३-२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर बेल्जियमने चौथा गोल करून ४-२ अशी मोठी आघाडी मिळून दिली. अखेरच्या मिनिटात बेल्जियमने पाचवा गोल करून ५-२ अशा विजय मिळवला. बेल्जियमने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकिच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय संघाच्या उपांत्य फेरीची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पाहत होते. त्यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट देखील टाकली होती. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी संघासाठी संदेश देखील पाठवला.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.