जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणे गरजेचे आहे. या वारसांना केवळ महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ३४ युवकांच्या कुटुंबीयांना १० लाखांचे अर्थसहाय्य केले असल्याचेही टोपे म्हणाले. ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली, त्यांची यादीही ट्विटरवरून शेअर केली आहे. सतत पाठपुरावा केल्याने ही मदत देण्यात आली. शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सहा, जालना तीन, बीड ११, उस्मानाबाद दोन, नांदेड दोन, लातूर चार, पुणे तीन, अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.