जन आशीर्वाद यात्रेचे ठाण्यात जोरदार स्वागत
ठाणे : ठाणे जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्याचा वनवास संपवला. त्यांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून पंचायत राज विभागाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे-पालघर जिल्ह्याला न्याय देईन, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यातील केंद्रीय मंत्री राज्यभर जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आज खा. कपिल पाटील यांची यात्रा ठाण्यात पोहोचली. यावेळी यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आ. किसन कथोरे, माजी खासदार किरीट सोमैया, माजी खासदार संजीव नाईक, माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह आदी नेते उपस्थित होते.
आनंद नगर टोल नाक्याहून सोमवारी यात्रेला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. पारंपारिक वेशभुषेतील आगरी कोळी बांधवांनी कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून यात्रेला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी विकास कामे करण्यासाठी संधी दिली. ही जबाबदारी पूर्ण करणार आहे. याआधी भरकटलेल्या मार्गाचे चालत होतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिशा दाखवली असून भारतीय जनता पार्टी माझे कुटूंब म्हणून मी काम करून दाखवेन असा विश्वास यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
सोमवारी पहिल्या दिवशी जनआशिर्वाद यात्रा ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.