• Privacy Policy
  • Advertise With us
  • Contact Us
सोमवार, मार्च 27, 2023
  • Login
No Result
View All Result
Google News
The GNP Marathi Times
Marathi News App
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
No Result
View All Result
GNP Marathi Times
No Result
View All Result
  • कोलशेत
  • राजकीय
  • क्रीडा
  • आरोग्य
  • व्यवसाय
  • शैक्षणिक
  • Contact Us
  • Our Authors
Home राज्य बातमी - State News महाराष्ट्र बातमी - Maharashtra News

हरितालिका व्रत का करावे ? जाणून घ्या शुभ वेळ आणि पद्धत

by GNP Team
सप्टेंबर 8, 2021
in महाराष्ट्र बातमी - Maharashtra News, राजकीय बातमी - Political News
1
हरितालिका व्रत का करावे ? जाणून घ्या शुभ वेळ आणि पद्धत
0
SHARES
47
VIEWS
Follow us Follow us Follow us

चातुर्मासामधील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते, परंतु त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करणे अगदी प्राचीन काळापासूनची परंपरा आपल्याकडे आहे. कुमारिका व महिला हे व्रत करतात. देशाच्या अनेक राज्यांमध्ये हरितालिका व्रत आवर्जून साजरे केले जाते. हरितालिकेच्या व्रतामध्ये उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागामध्ये राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा-महेश्वराचे पूजन केले जाते. उमा-महेश्वराचे पूजन केल्याशिवाय गणपतीचे पूजन केले जात नाही, अशी प्रथा फार आधीपासूनच आहे. हरितालिका व्रताचरणामध्ये संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे करण्यात येते. हरितालिका व्रत नक्की कसे करावे? व्रतामागील आशय नेमका काय? व्रतकथा, पूजाविधी व आरती यांसंदर्भात आज आपण जाणून घेऊया…

हरितालिका व्रताची शुभ वेळ 

यंदा गुरुवार म्हणजेच ९ सप्टेंबर २०२१ रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरीही शिव-पार्वतीची उपासना म्हणून हे व्रत केले जाते. पंचांगाप्रमाणे, भाद्रपदामधील शुक्ल पक्षाची तृतीया तारीख बुधवार, ८ सप्टेंबर रोजी बुधवारी पहाटे ३.५९ वाजता असेल. जे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनीटपर्यंत राहील. त्यानंतर चतुर्थी तिथी लागेल. धार्मिक विद्वानांच्या मताप्रमाणे, चतुर्थी तिथी असलेली तृतीया तिथी अधर्म नष्ट करते. हरितालिका व्रत हे माता पार्वतीच्या कृपेमुळे भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा सण असून, दरवर्षी हा उपवास भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला करण्यात येतो. या हरितालिका व्रतावर सुमारे तब्बल चौदा वर्षांनंतर रवि योगाचा दुर्मिळ योगायोग केला जात आहे. हरितालिका व्रताच्या पूजेकरिता योग्य वेळ संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटं ते सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे. पंचांगाप्रमाणे, रवि योगाचा एक दुर्मिळ योग सायंकाळी ५.१४ पासून प्राप्त होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये रवि योग फार प्रभावी मानला जातो. असेही म्हटले जाते की, रवि योगाने अनेक अशुभ योगदेखील निष्प्रभावी होतात.

हे पण वाचा :  "भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत": प्रियांका गांधी

हरितालिका व्रत कोणी करावा?

हरितालिकेचा व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया करतात. देशामधील बऱ्याच भागांमध्ये सखी व पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती अगदी प्राचीन काळापासून आहे. सकाळी नित्योपचार उरकल्यानंतर हरितालिका व्रतपूजनाचा संकल्प करावा. पार्वती व तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर त्याची स्थापना करण्यात येते, तर या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यात येते. पूजा करून हरितालिकेकरिता हिरव्या बांगड्या, वेगवेगळ्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर स्त्रिया कडक उपवास करतात. 

हरितालिका व्रत कसे करावे?

या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवेकोरे कपडे परिधान करतात. साजशृंगार करतात. पूजेकरिता चौपाटीवर केळीच्या पानांचा मंडप करून त्यामध्ये वाळूचे शिवपिंड करतात अथवा शिव-पार्वतीची प्रतिमा ठेवतात. हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करण्याची प्रथा असून, काही महिला निर्जळी उपवास करतात. कुमारिका चांगला पती मिळावा आणि विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, याकरिता हे व्रत करतात. वेगवेगळे खेळ खेळून रात्र जागविली जाते, गाणी म्हंटली जातात अथवा  भजन-कीर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते व आरती म्हणतात. यानंतर या मूर्तींचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो. याला ‘पारणे’ असे म्हणतात.

हे पण वाचा :  "भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत": प्रियांका गांधी

हरितालिका व्रताची कहाणी काय?

हिमालय पर्वतराजाची कन्या म्हणजेच पार्वती ही उपवर झाली. तसेच नारदाच्या सल्ल्यामुळे तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूसोबत करण्याचा निर्णय घेतला, परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला होता की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. एवढेच बोलून ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली. शिवप्राप्तीकरिता अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग बारा वर्षे फक्त रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. दिवसभर कडक  उपवास करून जागरण केले. तिच्या तपामुळेच महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकारदेखील केला, अशी आख्यायिका आहे.

हे पण वाचा :  "भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत": प्रियांका गांधी

येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.

This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.

GNP Team

GNP Team

संबंधित बातम्या

“भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत”: प्रियांका गांधी

“भारताचे पंतप्रधान भित्रे आहेत”: प्रियांका गांधी

by GNP Team
मार्च 26, 2023
0

काँग्रेस सरचिटणीस आणि राहुल गांधींची बहीण, प्रियंका गांधी वाड्रा यांनी...

“भाजप तुमचे हक्क काढून घेण्याचे काम करत आहे,” राहुल गांधी त्यांच्या पहिल्या गुजरात रॅलीत आदिवासींना म्हणाले

राहुल गांधी दोषी ठरल्यानंतर संसदेच्या दिवसापासून अपात्र ठरले

by GNP Team
मार्च 24, 2023
0

काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, त्याचे माजी अध्यक्ष राहुल...

2019 मध्ये ‘सर्व चोर मोदी’ या टिप्पणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

2019 मध्ये ‘सर्व चोर मोदी’ या टिप्पणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

by GNP Team
मार्च 23, 2023
0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या...

गुजरात निवडणूक: आसामच्या मुख्यमंत्र्यांनी खर्गे यांच्या चहापानावर टीका केली

“आसाममधील सर्व मदरसे बंद करण्याची योजना”: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

by GNP Team
मार्च 17, 2023
0

भूतकाळात, श्री सरमा यांनी अनेकदा मदरसे कमी करण्याची किंवा या...

धनुष्य-बाण चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एससीकडे जावे

ठाकरे सेनेला आणखी एक झटका, आणखी एका आमदाराने शिंदे सेनेत प्रवेश केला

by GNP Team
मार्च 15, 2023
0

आमदार दीपक सावंत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...

अदानी रांगेत विरोधकांचा मोर्चा, संसदेजवळ पोलिसांशी मोठा सामना

अदानी रांगेत विरोधकांचा मोर्चा, संसदेजवळ पोलिसांशी मोठा सामना

by GNP Team
मार्च 15, 2023
0

यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला आहे की अदानी समूह...

Load More
Next Post
अखेर मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश महाडमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू ;

अखेर मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश महाडमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू ;

Please login to join discussion

ताजी बातमी

  • मुंबई गुन्हा | मुंबईतील ग्रँट रोड येथे शेजाऱ्याने पाच जणांवर चाक…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • नितीन गडकरी | केंद्रीय रस्ते वाहतूक गडकरींचा मोठा दावा – 2…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • फर्स्ट सिटिझन्स बँकेने खरेदी केली सिलिकॉन व्हॅली बँक, जाणून घ्या …
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • महाराष्ट्राचे राजकारण | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यास…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत
  • उमेश पाल खून प्रकरण | माफिया डॉन अतिकला घेण्यासाठी STF साबरमती क…
    मार्च 27, 2023
    प्रतिक्रिया नाहीत

प्रायोजित पोस्ट

हवामान

जाहिरात


  • ठाणे महानगरपालिका  अनधिकृत इमारतींमध्ये घर घेऊ नका

    Maha covid relief : कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान, प्रशासनाने केली वेबसाइट, वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • DIZO Buds Z Earbuds भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • E-Peek Pahani ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Jyotika in Sukh Mhanje Nakki Kay Asta : Ketki Vilas : Ketki Palav : सुख म्हणजे नक्की काय असतं मधील ज्योतिका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • D. B. Patil : डी. बा. पाटिल कोण होते?

    0 shares
    Share 0 Tweet 0

कॅटेगरीज

Read today's news in Marathi. GNP Marathi Times provides the latest news in the Marathi . मराठी भाषेतील बातम्या वाचा. marathi breaking news Our Authors/ Editors Contacts
Name - Pushkaraj Gharat
Email- pushkaraj@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 7208534445

Name - Umesh Daki
Email - umesh@gnptimes.in
Address- Thane, Maharashtra, India
Contact - 8355915111

  • Contact Us
  • Marathi News RSS Feed
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Advertise With us

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ताजी बातमी
  • राजकीय बातम्या
  • जिल्ह्या नुसार बातम्या
    • ठाणे बातम्या
      • कल्याण डोंबिवली बातम्या
      • नवी मुंबई बातम्या
      • कोलशेत बातम्या
      • भिवंडी बातम्या
    • मुंबई बातम्या
    • नागपुर बातम्या
    • नाशिक बातम्या
    • चंद्रपूर बातम्या
    • सिंधुदुर्ग बातम्या
    • पुणे बातम्या
    • पालघर बातम्या
    • बिड बातम्या- Bid News
    • नंदुरबार बातम्या
    • सातारा बातम्या
    • औरंगाबाद बातम्या
    • सोलापूर बातम्या
    • कोल्हापूर बातम्या
  • आरोग्य बातम्या
  • क्रीडा बातम्या
    • क्रिकेट बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • शैक्षणिक बातम्या
  • करमणूक बातम्या
    • बॉलीवूड बातम्या – Bollywood News
  • तंत्रज्ञान बातम्या
    • कार बातम्या
    • मोबाइल संबंधित बातम्या
  • राज्य बातम्या
    • महाराष्ट्र बातम्या
  • व्यवसाय बातम्या
    • क्रिप्टोकरन्सी बातम्या
  • राशी भविष्य

© 2021 Gharat’s News Platforms Private Limited This website Uses Cookies. This Website is Developed and Maintained byGharat’s News Platforms Private Limited

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In