मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि रत्नागिरी सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रितसर अर्ज करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड येथे असताना त्यांना मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांना संगमेश्वर येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता नारायण राणे यांना संगमेश्वरहून महाड येथे नेले जात आहेत. तेथे त्यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.