स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.
माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.