स्रोत: रत्नागिरी खबरदार
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवाळीचे फटाके आता बॉम्ब फोडण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. शनिवारी सकाळी नवाब मलिक यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. समीर दाऊद वानखेडे यांनी आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण केले होते, महाराष्ट्र सरकारनेही एसआयटी स्थापन केली आहे, आता कोण वानखेडेंच्या कापाटातून सांगाडे बाहेर काढते ते पाहुया, असे सूचक वक्तव्य केले आहे.
मलिक म्हणाले, मी एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. आता एक नाही तर दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. एक राज्याची, एक केंद्राची. आता हे पाहणे महत्वाचे ठरेल, वानखेडेंचा कोण पर्दाफाश करतो आणि त्यांची खासगी आर्मीचा बुरखा फाडतो, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.