मुंबईकरांकरिता सगळ्यात मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता वाहतूक पोलीस अनावश्यकपणे थांबवून तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत, विनाकारण तुमचे वाहन तपासू शकणार नाहीत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत एक परिपत्रक वाहतूक विभागाला जारी केले आहे. परिपत्रकामध्ये असे म्हटले आहे की, वाहतूक पोलीस आता कोणत्याही वाहनांची तपासणी करणार नाही, विशेषत: ज्या ठिकाणी चेक नाका आहे. तेथे पोलीस केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील, तसेच वाहतूक कशी सुरळीत चालू राहील यावर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे एकूणच वाहतुकीवर त्याचा काही फरक पडत असेल तरच वाहतूक पोलीस थांबवतील. किंबहुना, बऱ्याचदा असे दिसून आले आहे की, वाहतूक पोलीस संशयाच्या आधारावर वाहने कोणत्याही ठिकाणी थांबवतात व वाहनाच्या आतील भाग तपासू लागतात. त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो.
वाहतूक पोलिसांमार्फत शुल्क आकारले जाऊ शकते
सीपी नगराळे यांनी वाहतूक विभागाला जारी केलेल्या या परिपत्रकामध्ये सर्व वाहतूक पोलिसांना वाहनांची तपासणी थांबवण्यास सांगण्यात आले आहे, कारण रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते व असे केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो, ट्राफिक वाढते. त्यामुळे पोलिसांना वाहतुकीच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याकरिता प्राधान्य देण्यास सांगितले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, जर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार वाहतूक पोलिसांमार्फत शुल्क आकारले जाऊ शकते.
वाहतूक पोलिसांनी संशयाच्या आधारावर वाहनांना थांबवू नये
वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदी काळात, वाहतूक पोलीस फक्त वाहतूक उल्लंघनांवर कारवाई करतील, मात्र ते वाहने तपासणार नाहीत. या सूचनांची वाहतूक पोलिसांनी जर काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास यासंबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षकच याला जबाबदार असतील. वाहतूक पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आता स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांनी संशयाच्या आधारावर वाहनांना थांबवू नये. ते म्हणाले की, आमचे जवान आधीसारखेच वाहतुकीच्या गुन्ह्यांविरूद्ध चालना देत राहतील. वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्यांना रोखत राहतील.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com