भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याला कशाचीही अपेक्षा नसल्याचे सांगितले. मी लोकांमध्ये असून राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत टिप्पणी केली होती. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला कसलीही अपेक्षा नसल्याचे म्हटले. पंकजा मुंडे यांनी या आधीदेखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मला आता कशाचीही अपेक्षा नाही. मी लोकांमध्ये आहे. मी राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नाही असेही पंकजा यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे स्थापन केलेल्या सरकारबाबत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्या शपथविधीबाबत दोन्ही नेत्यांनी भाष्य केले आहे. आता त्या शपथविधीला दोन वर्षे झालीत. पुढे आणखी काही वर्ष होतील असेही पंकजा यांनी म्हटले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.