अंबरनाथ : कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने कोरोना नियमांचे पालन करून नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करावा,असे आवाहन अंबरनाथ पोलिसांनी नवरात्री उत्सव मंडळांना केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या पश्चिम भागातील नवरात्री उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय बेंडे यांनी शुक्रवारी बोलावली होती.
कोरोनामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव देखील साजरा करावा. सार्वजनिक मंडळांची चार आणि घरगुती देवीची मूर्ती दोन फूट उंचीची असावी. गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. आरती, भजन आदी धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी टाळावी. देवीच्या मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन केबल नेटवर्कद्वारे व्यवस्था करावी, मंडपाच्या जवळ हार, फुले आणि प्रसाद विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत. घरातील देवीचे घरीच विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळांनी मंडपात व्यवस्था करून देवीच्या मूर्तींचे विसर्जन करून उत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
माजी नगरसेवक ऍड. निखिल वाळेकर, संजय गावडे, अनिल डावरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.