मुंबई : महाराष्ट्रात आता पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आता रविवारपासून पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. त्यानंतर पुढील २४ तासांत ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी, याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल. यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.