अकोला : राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अभ्यासपूर्ण व्यक्तव्य न करता अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार करणाऱ्या राजनाथ सिंह यांना महाराष्ट्रात येताना विचार करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. मिटकरी म्हणाले, राजनाथ सिंह हे जरी देशाचे संरक्षण मंत्री असले तरी फ्रान्सला राफेल खरेदी करताना भारताचे दिवाळे काढले हे अख्ख्या जगाने पाहिले आहे. राजनाथ सिंह यांनी काढलेले व्यक्तव्य हे अकलेचे दिवाळे काढणारे आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, भाजप अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम होतोच आहे. राहिली सुरली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांवर बोलताना थोडा अभ्यास करून बोलावे, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदेल आणि तुम्हाला सुध्दा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल. परत शिवाजी महाराज, शहाजी राजे, जिजामाता जिजाऊ हे एकच हेच कुटुंब आहे. विरबाजी पासलकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. दादोजी कोंडदेव यांचा त्यांच्याशी संबंध नाही, असेही मिटकरी यांनी सांगितले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.