ठाणे : ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टला एकाच दिवशी दीड लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा अशा दोन्ही डोसचा समावेश आहे.
जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण करण्यात सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला जोर धरलेल्या मोहिमेचा वेग मंदावला आहे. मागील काही दिवसांपासून आठवड्यातून केवळ एक ते दोन दिवस वगळता अन्य दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्याची वेळ पालिका व जिल्हा आरोग्य विभागावर ओढवली होती. जून महिन्यात ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला होता. जुलै महिन्यात लस तुटवड्याची समस्या जाणवू लागली असून यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे. लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाला आठवड्यातून दोन ते तीन दिवसच लसीकरण केंद्रे सुरु ठेवली जात आहेत.
दरम्यान, रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत, आरोग्य उप संचालक डॉ गौरी राठोड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास साळवे, परिचारिका भाट, बने, निकिता आणि शिंदे यांच्या सहकार्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑफलाईन पद्धतीने पहिला व दुसरा डोस असे एक हजार 562 जणांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.