मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत.
सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.