पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तसे संकेत दिले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेऊ नये असा दबाव आहे. त्यामुळे आगामी काळातील नियोजित महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
याबाबत शरद पवारांनी माहिती दिली आहे. पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. राज्यातील सर्व पक्षाच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. आता निवडणूक एक, दोन वर्षे पुढं ढकलनं योग्य वाटत नसल्याचं ते म्हणाले आहेत.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.