ठाणे : दहीहंडीला जागतिक स्वरूप देणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दोन वर्षात कोरोना आणि निर्बंधामुळे आर्थिक उलाढाल थांबली असून या उत्सवावर उपजीविका असणाऱ्या व्यावसायिकांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे.
दोन वर्षांपूर्वी दहीहंडीच्या निमित्ताने इव्हेंट मॅनेजमेंट, डीजे, कलाकार, लाईट सिस्टीम, स्टेज, ध्वनी यंत्रणा अशा अनेक व्यावसायिकांना सुगीचे दिवस होते. ठाण्यात या निमित्ताने पाच ते सहा कोटींची उलाढाल होत होती.
मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रकमेच्या बक्षीसांची लयलूट करणारे शहर म्हणून ठाण्याची ओळख झाली आहे. येथे दीड ते पावणे दोन कोटी रुपयांची बक्षिसे केवळ गोविंदा पथकांवर उधळण्यात आली होती. आठ ते नऊ थरांसाठी १५-१५ लाखांची बक्षिसेसुद्धा मंडळांनी मिळवली होती.
या उत्सवात जनरेटर, कॅटरिंग व्यवसाय, आकर्षक पारितोषिके, कलाकारांसाठी भाडेतत्त्वावरील वाहने, जाहिराती, फ्लेक्स प्रिंटिंग, सुरक्षारक्षक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचे कार्यक्रम, अशा असंख्य आघाड्यांवर कामकाज होत असे. त्यातून शेकडो हातांना काम मिळत असे. मात्र यंदा कोरोनामुळे हे सर्वच व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेले कामगार उत्पन्नास मुकले आहेत.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.