ठाणे : पालिका निवडणुका आल्या असल्याने जिल्ह्यातील दोन्ही मंत्री धरण-धरण करत असून नागरिकांना भूलथापा न मारता ठोस प्रस्ताव आणावा, असे आवाहन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले आहे. दरम्यान त्यांनी एमआयडीसी आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी पुरवठा वाढवून तो सुरळीत करावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आमदार संजय केळकर यांची टीका
सत्ताधारी शिवसेना ठाणे महापालिकेचे स्वतःचे धरण निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरली असून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काहीतरी करत असल्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. ठाणे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सोसावा लागत असून टँकर माफिया, पाणी माफिया दिवा आणि घोडबंदर भागात जनतेची लूट करत असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
आज पाणी समस्येबाबत श्री.केळकर यांनी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन पाणी पुरवठा वाढवून देणे आणि तो सुरळीत करण्याची मागणी केली. यात अपेक्षित बदल दिसून आला नाही तर शहरभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.