ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. आज ३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४७जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चार प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी केवळ एका रूग्णाची भर पडली.
महापालिका हद्दीतील प्रभाग समितीक्षेत्रात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत चालला आहे. सर्वात जास्त १९ रूग्ण माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. पाच रुग्णांची भर कळवा प्रभाग समिती परिसरात पडली आहे. प्रत्येकी चार रूग्ण वर्तकनगर आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती येथे वाढले आहेत. लोकमान्य- सावरकरनगर, उथळसर, दिवा आणि मुंब्रा या प्रभाग समिती परिसरात प्रत्येकी एक रूग्ण नोंदवला गेला आहे तर सर्वात कमी शून्य रुगणांची नोंद वागळे प्रभाग समिती भागात झाली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ३४ हजार ३८४ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी ४४१जणांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत दोन हजार ७८जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील दोन हजार ६१२ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३७ रूग्ण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत १८ लाख ९१ हजार २२९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ३६ हजार ९०३जण बाधित सापडले आहेत.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.