ठाणे : शहरात कोरोनाचे फक्त २९ रूग्ण सापडले असून ४३जण कोरोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तीन प्रभाग समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रत्येकी एका रूग्णाची भर पडली आहे.
महापालिका हद्दीतील कोरोना परतीच्या प्रवासाला लागला आहे. सर्वात जास्त १० रूग्ण माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात मिळाले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये सहा तर उथळसर येथे चार रूग्ण वाढले आहेत. प्रत्येकी दोन रूग्ण रूग्ण कळवा, वर्तकनगर आणि दिवा प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत. वागळे, मुंब्रा आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती परिसरात सलग दुसऱ्या दिवशी एका रूग्णाची भर पडली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४३जण कोरोनामुक्त झाले आहेत.आत्तापर्यंत एक लाख ३४ हजार ४२७जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर ४२७ जणांवर रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत दोन हजार ७८जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील दोन हजार ३६९ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये अवघे २९जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत १८ लाख ९३ हजार ५९८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ३६ हजार ९३२जण बाधित मिळाले आहेत.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.