ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या ठरू शकते चिंताजनक
ठाणे : नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय कार्यालयात लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही नाशिक पॅटर्न राबवण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
ठाणे जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. काल जिल्ह्यात चार रुग्णांची नोंद झाल्याने निर्बंधांची गरज व्यक्त होत आहे. रूग्णसंख्या वाढू नये म्हणून राज्य सरकार रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा विचार करत आहे. नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दोन लसीचा डोस घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे, परंतु ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालयात कोणाचीही तपासणी केली जात नाही. नागरिक फक्त प्रवेश मिळवण्यासाठी मास्क लावतात. त्यानंतर कर्मचारी आणि नागरिक दोघांच्याही तोंडावर मास्क दिसत नाही. शहरातील रस्त्यावर देखील बहुसंख्य नागरिक विनामास्क फिरत असतात. त्यांच्याकडे पोलीस आणि महापालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी देखील बंद करण्यात आली आहे, त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ठाणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने दोन डोस घेणाऱ्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी जागरूक ठाणेकर करत आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोना लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तेथे रूग्णसंख्या वाढत होती, त्यामुळेच त्यांनी दोन डोस न घेणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घातले असल्याचे ठाणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.