राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणार आहे. दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान असणार आहे. अधिवेशन वाढवायचं किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असं राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं असणार आहेत. तर तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी सांगितलं.
अनिल परब म्हणाले की, 24 डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचं किंवा नाही यावर निर्णय होईल. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश मिळणार आहे, असं परब यांनी सांगितलं.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.