बारामती : पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असताना कोरोना रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी तालुका ठिकाणची कोविड सेंटर बंद करू नयेत अशी मागणी माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, राज्यशासन हे कोविडची तिसरी लाट येणार असून त्यास तोंड देण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज असल्याची माहिती देत आहे. अशी काळजीची परिस्थिती असताना शासनाकडूनच चक्क कोविडचे रुग्ण कमी झाल्याचे कारण देत पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.