मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला नाही. त्यावरुन, राष्ट्रवादीने मनसेवर टीका केली आहे. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच, शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे. म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.