ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांकडून फोन आले, अशी खळबळजनक माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नाव न सांगता सर्वसाधारण सभेत दिली. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. यावरून शिवसेना-भाजपात जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सध्या चांगलाच तापला आहे. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
महापौर नरेश म्हस्के यांच्या माहितीने सभागृहात खळबळ
पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे तसेच बांधकामे तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत या आदेशाची प्रत मिळावी अशी मागणी त्यांनी प्रशोत्तरराच्या तासात सभागृहात केली. मात्र महापौर नरेश म्हस्के यांनी कृष्णा पाटील यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत पालकमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांनी प्रशासनासोबत काय पत्रव्यवहार केला हे सांगणे बंधनकारक नाही तसेच प्रश्न घ्यायचा कि नाही हा अधिकार महापौरांचा असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री हे सभागृहाचा भाग नसल्याचे सांगत त्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे असे त्यांनी सभागृहात सांगितले.
कृष्णा पाटील यांनी घेत पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री यांच्या पत्रव्यवहारासंदर्भातच प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी थेट अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचेच फोन आले असल्याची खळबळजनक माहिती यावेळी दिली. मात्र कोणत्या मंत्र्यांचे फोन आले हे नाव त्यांनी सभागृहात जाहीर केले नाही.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.