सिंधुदुर्ग : शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कुणाला असतो हे कळणाऱ्याला माहीत असतं, असा सूचक विधानही नाईक यांनी केलं. तर, दुसरीकडे रत्नागिरीतून राणेंची यात्रा सुरू होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वैभव नाईक यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना हा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यासाठी हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही पण नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर मात्र आम्ही यात्रेला विरोध करणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
राणेंची मुले जर उद्धव ठाकरेंवर टीका करतील तर जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध राहील. पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहे. राणे हे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने संयम ठेवला पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. एक बाजूने संयम कधी राहणार नाही, दोन्ही बाजूने संयम ठेवला तर तो राहील, असंही ते म्हणाले. शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने सज्ज आहेत. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कोणाला असतो. तो कळणाऱ्याला माहीत असतो, असंही त्यांनी सांगितलं. तसेच प्रमोद जठार यांना खूप वर्षांनी सिंधुदुर्ग दिसला आहे. यात्रेच्या निमिताने त्यांना सिंधुदुर्ग दिसला हे बरं झालं, असा चिमटाही त्यांनी काढला.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.